बिरवाडीमध्ये दारूच्या अतिसेवनामुळे एका 38 वर्षीय इसमाचा मृत्यू..

0
Spread the love

उपसंपादक -राकेश देशमुख

बिरवाडी :-दारूच्या अति सेवनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत तसेच दारू अतिप्राशन केल्यामुळे अनेक तरुणांचा कमी वयातच मृत्यू झाला आहे. बिरवाडी विभागामध्ये दारूच्या अतिसेवनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

दिनांक 18 मे रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान दारूच्या अतिवेसनामुळे एका 38 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आशिष मनोहर महाले राहणार दासगाव असे मृत इसमाचे नाव असून त्याला दारूचे अतिवेसन होते. खरवली काळीज ग्रामपंचायत हद्दीतील स्मरण इंटरप्राईजेस शेजारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभागृह समोर आशिष हा मृत अवस्थेत सापडला.

आशिष महाले बिरवाडीतील आजूबाजूच्या परिसरामध्ये मोल मजुरीचे काम करीत असत, दारूचे अतिसेवन तसेच पोटामध्ये अन्न नसल्यामुळे आशिष याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. आशिष हा एक दिवस अगोदरच मरण पावला असून बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सदरचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे.

महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यूची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक इकबाल शेख, पोलीस हवलदार प्रवीण राठोड, पोलीस नाईक सतीश बोटे, पोलीस शिपाई सुनील पाटील हे या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट