२ पोटच्या लहान मुलांना लग्नाला जाते असे सांगून गेलेली आई न आल्याने विभागाात खळबळ..!

0
Spread the love

प्रतिनिधी-सचिन पवार

माणगांव:- रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यातील उतेखोलवाडी येथे भाड्याचा खोलीत राहणारी संगीता मनोज वाघरे ही महिला दोन दिवसापासून आपल्या पोटच्या मुलांना घरी सोडून लग्नाला गेली ती परत आली नाही.

मुलांजवळ सखोल चौकशी केली असता त्या मुलांनी आमची आजी येणार आहे म्हणून घरातून माणगांव बस डेपो जवळ पोबारा केला.

पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार असं सांगण्यात आले की, ही २ मुले कुमार सुरज मनोज वाघरे वय ६ वर्ष आणि कुमारी शिवांनी मनोज वाघरे वय ९ वर्ष हे सकाळपासून माणगांव बस डेपो जवळ फिरकत होती ही खबर पोलीसाना 112 नंबर वर माहिती मिळाली.

तात्काळ माणगांव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उप निरीक्षक श्री गायकवाड, पोलीस हवालदार श्री मयूर पाटिल, श्री. माटे, संमेल यांनी घटनास्थळी जाऊन त्या मुलांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे आणले व पुढील चोकशी केली .

त्यांना असे निर्दनास आले की ही दोन मुले उतेखोल वाडी येथे नामदेव डवले यांच्या इथे भाड्यावर राहतात. नामदेव डवले यांच्याशी माणगांव पोलिसांनी संपर्क साधून त्यांच्या ताब्यात त्या बालकांना सुखरूप दिले .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट