“ एक सिसीटीव्ही गावासाठी ” या उपक्रमांचे माध्यमांतुन लोकसहभागातुन ग्रामीण भागात 2078 सिसीटीव्ही कॅमेरांची सुरक्षा कवच …

उपसंपादक-रणजित मस्के
छत्रपती संभाजीनगर:
छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षकांचे अभिनव उपक्रमांस नागरिकांचा उदंड प्रतिसाद..!
मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांचे संकल्पनेतुन ग्रामीण भागात सिसीटीव्ही कॅमेरांचे सुरक्षा जाळे वाढविण्यासाठी लोकसहभागातुन “ एक सिसीटीव्ही गावासाठी ” हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याचे माध्यमांतुन गावातील प्रमुख चौक, रस्ते, बाजारापेठ, सराफा मार्केट, बँक व ए.टी.एम. परिसर, तसेच नागरिकांची गर्दीचे ठिकाणे ही सिसीटीव्ही कॅमेरांचे निगराणीखाली आण्याचा प्रमुख हेतु आहे.

तसेच ब-याच ठिकाणी नागरिकांनी त्यांचे घराचे किंवा दुकानांचे परिसरात सिसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. परंतु त्यांची व्याप्ती ही फक्त त्यांचे आस्थापना पुरतीच मर्यादीत होती. याबाबींचा विचार करून त्यांनी त्यामध्ये अजुन एक अतिरिक्त सिसीटीव्ही कॅमेरा बसवुन त्यांची दिशा ही स्थानिक पोलीस ठाण्याची मदत घेवुन त्यांचा अँगल हा रोड परिसरातील हालचाल टिपली जाईल अशी ठेवावी.
तसेच गावामधील प्रमुख चौक, रस्ते, बाजारपेठ, व्यापारी संकुल इत्यादी ठिकाणी ही नव्याने सिसीटीव्ही कॅमेरांचे निगराणी खाली आण्यासाठी तेथे सिसीटीव्ही कॅमेरांचे सुरक्षा जाळे वाढविण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपरिषद, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक यांनी पुढाकार घेवुन गावामध्ये सिसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा बसविण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक यांनी आवाहन केले होते.
या सिसीटीव्ही कॅमेरामुळे नागरिक व त्यांचे मालमत्तेच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातुन प्रभावी सुरक्षा कवच उपलब्ध होवुन त्याचे माध्यमांतुन गावात घडणा-या गुन्हयांची चित्रीकरण होवुन त्या सबळ पुराव्याचे आधारे पोलीसांना गुन्हयांची उकल होण्यासाठी प्रभावी मदत होत आहे.

मा. पोलीस अधीक्षक यांचे आवाहानास जिल्हयातील 23 पोलीस ठाणे अंतर्गत येणा-या विविध गाव व शहरातील 113 नागरिक व ग्रामपंचायत यांनी गाव/शहराचे सुरक्षीतते करिता उत्सफुर्तपणे पुढाकार घेवुन त्यांचे योगदानातुन त्यांनी जवळपास 734 ठिकाणी 2078 सिसीटीव्ही कॅमेरे बसवुण गावात सुरक्षा जाळे वाढविण्यात मोलाचे योगदान दिले आहे. ज्यामुळे गावाला एक सुरक्षा कवच मिळण्यास मदत झाली आहे. या उपक्रमांचे माध्यमांतुन जवळपास दरोडा, जबरीचोरी, यासारखे 18 गुन्हयांची उकल करण्यास पोलीसांना मदत झाली आहे.
आज दिनांक 20/10/23 रोजी सायं 17:00 वाजेला “ एक सिसीटीव्ही गावासाठी ” या उपक्रमांचे उद्घाटन समारंभ मा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर, प्रस्ताविक करतांना मा. सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक यांनी या उपक्रमांचा मुख्य उद्देश हा गावातील नागरिकांच्या सुरक्षेसह, महिला व मुली यांना रस्त्यावरुन जातांना टवाळखोरांकडुन होणारी छेडछाड, खोटया तक्रारींना प्रतिबंध होणे, संशयीत व्यक्तींचा होणारा वावर याला आळा घालणे इ.
असुन नागरिकांनी स्वत: यामध्ये पुढाकार घेवुन सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन पावले उचलुन पोलीसांना महत्वाचे सहकार्य केल्याचे नमुद केले आहे.
मा. पोलीस अधीक्षक यांनी मार्गदर्शन करतांना गावातील पोलीस पाटील, सरपंच, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी यांनी या उपक्रमांचे आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देवुन गावाचे सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन महत्वाची भुमीका बजावली आहे. त्याचे या सहकार्य मुळे पोलीसांना ब-याच अंशी गुन्हयांचा छडा लावण्यास मदत होवुन त्यांना प्रतिबंध करणे शक्य होईल. त्याच प्रमाणे सण-उत्सवाचे अनुषंगाने गावातुन निघणारे मिरवणूक, रॅली यामध्ये गैरसमजातुन होणारे तंटे ज्यामुळे धार्मिक व सामाजिक सौहार्द खराब होऊन गावातील वातावर दुषीत होते . कॅमेराचे माध्यमांतुन खरी व सत्य घटना समजुन घेण्यास मदत होवुन दोषीवर कारवाई करणे पोलीसांना सोपे होईल. याचप्रमाणे गावात संशयीत रित्या फिरणा-या व्यक्तींना कॅमेरा पाहुन भिती निर्माण होवुन ते गावात वावरणे बंद करतील ज्यामुळे भुरटया चो-यावर प्रतिबंध होेण्यास मदत होईल. रोडरोमियो, टवाळखोर, स्टंटबाजी करणारे यांच्या सर्व हरकती या कॅमे-यात टिपल्या जात असल्यामुळे त्यांची ओळख पटवुन त्यांचे विरुध्द कारवाई करणे अत्यंत सोपे होईल ज्यामुळे शालेय व महाविद्यालयीन मुली तसेच महिला यांना रस्त्याने जातांना येतांना त्रास होणार नाही.
सिसीटीव्ही कॅमेरे च्या माध्यमांतुन एक तांत्रिक सुरक्षा व्यवस्था आपण निर्माण करतो आहे ज्याचे माध्यमांतुन अघटीत घडलेल्या घटनांचा शोध लावण्यास मदत होवुन अशा घटनांची पुनावृत्ती होणार नाही यास प्रतिबंध सुध्दा करणे शक्य होते. त्यामुळे नागरिकांना अजुनही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवुन आपल्या सुरक्षिततेसाठी एक कॅमेरा आवर्जुन बसवावा असे आवाहन केले आहे.

मा. विशषे पोलीस महानिरीक्षक यांनी मार्गदर्शन करतांना हा “ एक सिसीटीव्ही गावासाठी ” उपक्रम कौतुकास्पद असुन हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेतलेल्या नागरिकांचे अभिनंदन करून त्यांचे वर्तन हे प्रगल्भ व प्रगतशील समाजाचे दर्शन असुन यामुळे 24 तास जागी राहणारी सीसीटीव्ही सारखी यंत्रणा कार्यन्वित केल्याने याचा फायदा हा सर्वांनाच होतो. याचे माध्यमांतुन नि:पक्षपणे माहिती उपलब्ध होते. ज्यामुळे खरे आणि खोटे सिध्द होण्यास वेळ लागत नाही. नागरिकांनी सण/उत्सव साजरा करतांना वर्गणी जमा केली जाते यातुन एक सुरक्षेचा भाग म्हणुन यातील काही रक्कम ही कॅमेरा बसविण्यासाठी खर्च करावी. तसेच वाढदिवस साजरा करण्यासाठी केला जाणारा खर्च टाळुन त्यातुन सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. कारण आपली सुरक्षा ही अत्यंत महत्वाची आहे. पोलीस तर कायम आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असतात परंतु त्यांना तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास गुन्हयांना प्रतिबंध घालण्यास निश्चीत मदत होईल ज्यामुळे आपण एक सुरक्षित समाजाकडे वाटचाल करण्यास मदत होईल. त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

नमुद कार्यक्रमा जिल्हयातुन मोठयाप्रमाणावर नागरिकांची उपस्थितीती होती तसेच सर्व प्रभारी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे सह पोलीस अंमलदार यांची उपस्थिती होती.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com