वकील श्रीमती. मनजीत कौर मतानी यांचे जागरण कार्यक्रमात तरुणांना व्यसनमुक्त होऊन आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन…

उपसंपादक – रणजित मस्के
भंडारा :- हा देश संत महात्म्यांचा आहे. अशा भूमीतही व्यसनाधीनता वाढणे ही अशोभनिय बाब असून व्यसन ही आजच्या तरुण पिढीला लागलेली कीड आहे. त्यामुळे समाजाची तर हानी होतेच पण त्याचे परिणाम कुटुंबालाही भोगावे लागतात. त्यातून विध्वंशक कृती घडते, प्रसंगी घातपाताचेही कारण बनते. तेव्हा सुखी संसाराचे गौरीशंकर गाठायचे असेल तर तरुणांनो व्यसनांपासून मुक्त रहा, असा मौलिक सल्ला अॅड. मनजीत कौर मतानी यांनी दिला. बारव्हा येथील हनुमान देवस्थानात गणेशोत्सव जागरण कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी श्याम शिंदे, पं. स. सदस्य मधुर उके, सरपंच रंजित नैताम, नरसय्या गोणपल्लीवार, मोहन चुन्ने, भोजराज पागोटे, प्रशांत येनोरकर, बन्सी खत्री, ऐकांश चव्हाण, संदीप खत्री, वर्षा जाधव, आशा खत्री, मुकेश खत्री, सपना भव्या, रोशनी खत्री व अन्य मान्यवर मंचावरउपस्थित होते.

अँड. मतानी पुढे म्हणाल्या मी गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांची मुलगी आहे. गरिबीशी दोन हात करीतच मोठे झाले. शेतकऱ्यांच्या व्यथा मला कळतात म्हणून माझे ग्रामीण जनतेसोबतच ऋणानुबंध आहेत. उत्सवातच आपण सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतो. आपण एक दुसऱ्यांप्रती असलेला द्वेष व घृणास्पद भावना ज्यावेळी मनातून काढून टाकू तेव्हाच या जागरणाचे महत्व आपल्याला कळेल, असेही त्या म्हणाल्या. जागरण कार्यक्रमाला हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. मंडळातर्फे मतानी यांचा भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी यश खत्री, दुलेश शिवरकर, दिनेश लाडे, नितेश शिवरकर, ऐकांश चव्हाण, सुजित बुद्धे, प्रशांत पागोटे, जितू शिवरकर यांनी सहकार्य केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com
सुरक्षा पोलीस टाइम्स पत्रकार टिमवर्क


