सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे “संवाद- तक्रारदारांशी” उपक्रमाचे आयोजन संपन्न…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- गुरुवार दि. २० जुलै २०२३ रोजी सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक, सातारा, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या सहभागातून “संवाद तक्रारदारांशी” हा उपक्रम सातारा जिल्हयातील पोलीस उपविभागीय कार्यालय स्तरावर पार पडलेला आहे.

सदर उपक्रमाकरीता श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा हे कोरेगाव येथे तर श्री. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, हे फलटण येथे उपस्थित होते. त्याचबरोबर ०७ उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी हे त्यांच्या उपविभागाच्या ठिकाणी सदर उपक्रमाकरीता हजर राहून जिल्हयातील एकुण २९२ नागरीकांशी त्यांच्या तक्रारींचे अनुषंगाने संवाद साधलेला आहे. “संवाद तक्रारदारांशी” या उपक्रमामध्ये एकुण १३३ अर्ज दाखल झालेले असून अर्जाचे अनुषंगाने १ दखलपात्र गुन्हे, ८ अदखलपात्र गुन्हे, २८ प्रतिबंधक कारवाया, ३७ अर्ज चौकशीकरीता दाखल करण्यात आले ८ अर्ज इतर विभागाकडे वर्ग करण्यात आले, तसेच ४८ अर्जाचे अनुषंगाने संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना
सूचना देण्यात आल्या असून ४० अर्ज अभिलेखावर दाखल करण्यात आलेले आहेत.

तसेच सातारा पोलीस दलामार्फत दर १५ दिवसांनी म्हणजेच महिन्यातील पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी १०.०० ते १३.०० या वेळेत “संवाद तक्रारदारांशी” हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमामध्ये जिल्हयातील सर्व नागरिक, सैनिक व त्यांचे नातेवाईक यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आव्हानही सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे तक्रारदारांना त्यांच्या तक्रारींकरीता विनाकारण पोलीस अधीक्षक कार्यालयास तक्रार घेवून जावे लागणार नाही, तसेच पोलीस विभागाशी संबंधीत सर्व समस्या त्यांच्या जवळच्या ठिकाणी तात्काळ सोडविण्यास मदत होईल.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट