दापोलीत बहुजन समाज परिवर्तन परिषद संपन्न-प्रबोधनकार श्री. मारुतीकाका जोयशी ( मार्गदर्शक कोकणचे गाडगेबाबा..)

0
Spread the love

प्रतिनिधी-भास्कर पवार

बहुजन समाज परिवर्तन परिषदेस उपस्थित मान्यवर
      रविवार, दि. २८ नोव्हेंबर, २०२१ रोजी  सकाळी ११ ते सायं.५ या वेळेत दापोली तालुक्यातील शिरसाडी गावातील विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृहात 'कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा-दापोली (ग्रामीण), गट-पालगड' यामधील नूतन कार्यकारणी, महिला कार्यकारणी व सर्व बहुजन समाज बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने *कोकणचे गाडगेबाबा प्रबोधनकार मा. मारुतीकाका जोयशी यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन समाज परिवर्तन परिषद संपन्न झाली. या परिषदेला पालगड पंचक्रोशीतील सातेरे, शिरसाडी, जामगे, विसापूर, चिंचाळी, पालगड, शिरखल ओलवण, टांगर, हातीप, शिरसेश्वर, मुगीज व सोवेली या १२ गावातील कुणबी, मराठा, सुतार, चर्मकार, बौध्द समाज व इतर बहुजन समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती, गावकर, कारभारी, वारकरी, ग्रामस्थ व महिला अशी एकूण ६८१ लोकांच्या उपस्थित व सहकार्यातून परिषद अतिशय शिस्तबद्ध व प्रेरक वातावरणात संपन्न झाली.



        या परिषदेमध्ये प्रथम सुरूवात महामानवांच्या प्रातिमा पुजन व दिपप्रज्वलांनी झाली. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत व सत्कार झाले. त्यानंतर काकांचे सहकारी सत्यशोधक प्रवर्तक मा. मिलिंद कडवईकर सरांनी आपल्या प्रबोधनपर भाषणामध्ये अनिष्ट रुढी, चालीरीती व परंपरा या कशा निर्माण होतात. त्या बदलण्यासाठी आपण बहुजनांनी विवेकवादी, चिकित्सक व विज्ञानवादी दृष्टीकोन कसा बदलला पाहिजे हे सांगितले. त्यानंतर मा.संदिपजी रजपुते साहेबांनी प्रबोधनपर विचार मांडले. त्यानंतर काकांनी आपल्या प्रबोधनपर व्याख्यानात अनिष्ट रुढी, चालीरीती व परंपरा या कशा निर्माण झाल्या आणि त्यातून बाहेर कसे बाहेर पडले पाहिजे हे प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे समजावून सांगितले. बहुजन समाज 'भयमुक्त व भटमुक्त' झाला पाहिजे व आपले धार्मिक विधी कर्मकांड विरहित आपणच कमी खर्चामध्ये केले पाहिजेत. त्यांनी सत्यशोधक शिवविवाह, सत्यनारायणाच्या पूजेला पर्यायी व्यवस्था सम्राट बळीपूजा, मरणोत्तर फोटो पूजनाने कार्य व घरभरणी कशी करावी यांचे प्रात्यक्षिके व मार्गदर्शन केले त्यावेळी नाबार्ड मुंबईचे अधिकारी मा. ज्ञानेश्वर संकपाळ व त्यांच्या पत्नी प्रिया संकपाळ या सत्यशोधक शिवविवाह व सम्राट बळीराजा पूजनाला सहभागी होते. त्यांनी आपल्या मनोगतात समाजाने आता कृतीतून बदलले पाहिजे हे सांगितले.

         या परिषदेमध्ये स्वागत गीत, जिजाऊ वंदना, शिवपंचके आणि महामानवांच्या आरत्या समिक्षा गुडेकर, मनीकर्णिका गुडेकर, शर्वरी हुमणे, तृप्ती गुडेकर, पूजा गुढेकर, समृध्दी गुडेकर, मनोहर गुडेकर, सिमरन आणि मिलिंद कडवईकर सर यांनी सादर केल्या. या परिषदेला अध्यक्ष म्हणून मा.गणेश  तांबिटकर (अध्यक्ष- कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, ग्रामीण शाखा- दापोली, गट पालगड - गट), प्रास्ताविक व आभार मा. किशोर चौगुले (कार्याध्यक्ष - कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, ग्रामीण शाखा - दापोली, गट- पालगड) व सूत्रसंचालन मा. रमेश बोरकर सरांनी केले. या परिषदेला मार्गदर्शक कोकणचे गाडगेबाबा प्रबोधनकार मा. मारुतीकाका जोयशी, मा. ज्ञानेश्वर संकपाळ ( नाबार्ड अधिकारी, मुंबई), मा. प्रिया संकपाळ, सत्यशोधक प्रवर्तक मा. बाबू गुडेकर (सावर्डे, ता. चिपळूण, सामाजिक कार्यकर्ता), सत्यशोधक प्रवर्तक मा. गणपत भायजे (अध्यक्ष- युगपुरूष सम्राट बळीराजा सामाजिक प्रतिष्ठान चोरवणे, ता. सगमेश्वर), सत्यशोधक प्रवर्तक मा. विलासजी डिके (अध्यक्ष- श्रमिक कृषी संस्था,आरवली, ता. संगमेश्वर), सत्यशोधक प्रवर्तक प्रा. मिलिंद कडवईकर सर, सत्यशोधक प्रवर्तक मा. सचिन रामाणे (कुणबी युवा स्टार प्रचारक, मुंबई), सत्यशोधक प्रवर्तक प्रा. संदिप येलये, मा. शरद भावे (कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, ग्रामीण शाखा-दापोली, गट-पालगड अंतर्गत मुंबई मंडळ-अध्यक्ष), मा. अनुज चव्हाण (कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, ग्रामीण शाखा-दापोली, गट-पालगड, अंतर्गत मुंबई मंडळ- सचिव) मा. स्वाती गोरीवले (अध्यक्षा- कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, ग्रामीण शाखा-दापोली गट पालगड अंतर्गत महिला कार्यकारिणी), मा. शिवाजी कदम (निवृत्त पोलिस अधिकारी मु.जामगे), मा. दत्‍ताराम जाधव (मु. विसापूर), मा. दत्ताराम तळवटकर (पंचक्रोशी वारकरी संप्रदाय मंडळ पावनळ गट गाव उन्हवरे) मा.महेंद्र जालगावकर (बामसेफ जिल्हाध्यक्ष रत्नागिरी) मा. अनंत मर्चंडे (सामाजिक कार्यकर्ते पाचवली ता. दापोली), मा. अनंत मांडवकर (माजी अध्यक्ष म्हाळुंगे गट), मा.शांताराम निमदे (सामाजिक कार्यकर्ते मु. तिडे मंडणगड), मा. संदीपजी राजपुरे साहेब (दापोली), मा. भाई पोस्‍टुरे (माजी सभापती पंचायत समिती मंडणगड) मा.राजेंद्र फणसे साहेब (सोवेली, ता.दापोली), मा.दिनेश सापटे (कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, ग्रामीण शाखा- मंडणगड तालुका अध्यक्ष) मा.चंद्रकांत रेवाळे (सामाजिक कार्यकर्ते मंडणगड), मा.अनंत घाणेकर (मु. पालघर मंडणगड), मा.शाहीर लोखंडे गुरुजी (मंडणगड) मा. अजय तांबे (मु. मंडणगड भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव) मा. दिपक गोरीवले (माजी पंचायत समिती सदस्य दापोली),मा. अशोक बैकर (पालघर, तालुका मंडणगड) मा. दत्‍ताराम जाधव (विसापूर), मा. राजेंद्र पेडणेकर (अध्यक्ष -श्री संत तुकाराम महाराज ग्रामीण बिगर शेती पतपेढी मुगीज), मा. सुरेश वाजे, संजय कराडे (प्राथमिक शिक्षक), मा. दत्‍ताराम ठोंबरे, मा. प्रदीप कांबळे (प्राथमिक शिक्षक), मा. आग्रेसर, मा. श्रीधर पालशेतकर (सामाजिक कार्यकर्ते, तुरंबव ता. चिपळूण), मा. सुरेश बागवे गुरूजी (सल्लागार- कुणबी शिक्षक विचार मंच सावर्डे, ता. चिपळूण), मा. अनंत शिगवण गुरूजी (सल्लागार- कुणबी शिक्षक विचार मंच सावर्डे, ता. चिपळूण), मा. मारूती उदेग, मा. दत्ताराम उदेग, मा. मनोहर गुढेकर, मा. नारायण हुमणे, मा. लक्ष्मण हुमणे, मा. संतोष मते व मा. मनोहर उदेग इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट