सातारा जिल्हा पोलीसांची धडक कारवाई सातारा शहरातील टोळीतील ०२ जण तडीपार…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :- सातारा शहरात जबरी चोरी करणे, चोरी करणे, विनयभंग करणे, अपहरण करणे शिवीगाळ दमदाटी करणे, या सारखे गंभीर गुन्हे करणा-या टोळीचा प्रमुख १) संजय सायबु पवार, वय २२ वर्षे, रा. नामदेववाडी, झोपडपट्टी, सातारा. २) आशुतोष सयाजीराव भोसले, वय २३ वर्षे (टोळी सदस्य) रा.कृष्णविहार सोसायटी, शाहुनगर गोडोली सातारा यांना जिल्हयातुन तडीपार करणे बाबत सातारा शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक श्री. बी. बी. निंबाळकर, यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५५ अन्वये प्रस्ताव सादर केला होता. त्यांना हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, यांनी दोन वर्षा करीता पुर्ण सातारा जिल्हा हद्दीतुन हद्दपारचा आदेश केला आहे.


प्रतिबंधक कारवाई करुनही सदर टोळीच्या संशयीत हालचालीस प्रतिबंध झालेला नाही. त्यांचे कृत्यांमुळेसर्व सामान्य नागरीकांचे फार मोठे आर्थिक व शारिरीक नुकसान झाले आहे. हद्दपार यांना कायदयाचा धाक नसुन ते बेकायदेशीर कारवाया करीत आहेत. त्यांना सुधारणेची संधी देवुनही त्यांचे वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधुन त्यांचेवर कडक कारवाई करणे करीता मागणी होत होती. म्हणुन. त्यांना समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ अन्वये ०२ इसमांचेवर दोन वर्षा करीता सातारा जिल्हा हद्दीतून हद्दपारचा आदेश केला आहे. जिल्हयाचा पदभार स्विकारलेनंतर पोलीस अधीक्षक, समीर शेख यांनी ०४ प्रस्तावात ११ हसमांना हद्दपारचे आदेश केलेले आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाचे वतीने अपर पोलीस अधीक्षक, श्री. बापू बांगर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री. अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक, श्री. मधुकर गुरव, पो.ना.प्रमोद सावंत, पो.काँ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, यांनी योग्य पुरावा सादर केला. या कारवाईचे सर्व स्थरातून समाधान व्यक्त होत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com