म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खंबीर नेतृत्व हरपला…

0
Spread the love

प्रतिनिधी-राकेश देशमुख

म्हसळा: दुःखद बातमी समोर येते पांगलोळी गावचे जेष्ठ नेते अलीशेठ कौचाली यांचे दुःखद निधन झाले

या अत्यंत दु:खदायी बातमीने संपूर्ण परिसर हादरुन गेला आहे

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस जेष्ठ नेते रायगड रत्नागिरी जिल्हा लोकसभेचे खासदार श्री सुनील तटकरे साहेब यांचे जवळचे निकटवर्तीय समजले जाणारे अलि सेठ कौचाली यांचे रात्री 10.45 वाजता पुणे येथे रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.आज दुपारी जोहर च्या नमाज नंतर त्यांचे दफनविधी पार पडणार आहे.
म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महत्वाचा चेहरा समजला जाणारे ते एक होते अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत मनमिळावू गप्पा करणारे नेहमी हसत खेळत सर्वांशी राहणारे असे एक आपल्या खाडीपट्टा विभागातील आदर्श नेतृत्व म्हणजे अलिशेठ कौचाली साहेब,आज त्यांच्या या अचानक जाण्याने युवा नेतृत्वाला मिळालेली एक भक्कम आधाराची साथ अखेरची थांबली त्यांचे विचार नेहमीच प्रेरणादायी राहतील.

त्यांच्या सहवासात सर्व धर्म समभावाची शिकवण मिळत असे.
मोठ्या दिलदार मनाचे व्यक्तीमत्व कठोर काळाच्या पडद्याआड गेले.त्यांच्या आकस्मिक जाण्याने राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची कधीही न भरुन येणारी अपरीमीत हानी झाली आहे.
सर्वच समाजामध्ये व राजकीय श्रेष्ठींसोबत सुसंवाद, संबंध असलेला साखळीतला सुवर्ण दुवा निखळुन गेला याचे अतीव दु:ख संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाला व जिल्ह्यातील जनतेला होत आहे.असे व्यक्तीमत्व पुन्हा होणे नाही.संपूर्ण परिसरातून पवित्र स्म्रुतिस अभिवादन आणि भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे…

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट