राजापूर तहसीलदारांसमोर पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अमानुष खुन विरोधात निषेध मोर्चाचे आयोजन…

प्रतिनिधी- सुशिल तांबे


राजापूर: कोकण रिफायनरी विरोधक आणि वारंवार कोकणातील भूमी धारकांचे प्रश्न, कोकणवासियांचे प्रश्न सत्याने मांडण्याचे काम करीत असलेले पत्रकार शशिकांत वारीशे यांचा अमानुष खून पंढरी आंबेरकर या जमिनींची दलाली करणाऱ्या नराधमाने केला.
राजकीय व्यक्तिमत्वांसोबत शासन आणि पोलीस प्रशासनाने याला पाठीशी घातले असा आरोप सर्वसामान्य लोकांमधून होत आहे.

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ ज्याला आपण पत्रकार, पत्रकारिता म्हणतो ती आज या सर्व प्रकारामुळे धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.
या सगळ्याचा निषेध म्हणून राजापूर तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला, व यातील आरोपी व त्याचे सहकारी यांनी कट रचून हा अमानुष खून केला म्हणून या सर्वांना फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मांगणी साठी हजारो लोक आज रस्त्यावर उतरले होते.


यात प्रामुख्याने खंडाळा पंचक्रोशीचे अनेक तरुण निषेध व्यक्त करण्यासाठी उपस्थित होते. खंडाळा पंचक्रोशी विभागात अशाच पद्धतीचे प्रकल्प शासन आणि राज्यकर्त्यांनी थोपविले आहेत. आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आणि असे प्रकल्प थोपवून इथल्या स्थानिकांना प्रकल्प झाल्यानंतर या सगळ्यातून डावलले जाते ही भूमिका अतिशय पोटतिडकिने आणि निर्भीडपणे मांडण्याचा प्रयत्न आमचे सहकारी मित्र प्रथमेश गवाणकर याने केला आहे. इथुन पुढे आपली जबाबदारी अशा तरुणाच्या मागे खंबीरपणे उभ राहण्याची असल्याचे यावेळी प्रसाद सुजाता सुरेश पाष्टे यानी सांगितले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com