पालघर पोलीस दलाकडून राबविले “ऑपरेशन ऑल आऊट अभियान” ६५ पोलीस अधिकारी व २६६ पोलीस अंमलदारांनी राबविले अभियान..!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर.
दारुबंदी ११ गुन्हे दाखल,
गुटखा/सुगंधी तंबाखू ३ गुन्हे दाखल,
गुन्हेगार तपासणी -१२२ रेकॉडवरील गुन्हेगार,
वाहन नियमांचे उल्लंघन १३९ वाहन चालकांवर कारवाई.


पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, पालघर श्री. विनायक नरळे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे, प्रभारी अधिकारी यांचेसह २६६ पोलीस अंमलदारांच्या सक्रीय सहभागातुन दिनांक २७/०५/२०२५ रोजी “ऑपरेशन ऑल आऊट” राबविण्यात आले. सदर अभियानाचा मुख्य उद्देश हा सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस अमंलदार हे वरीष्ठ अधिकांऱ्याच्या नेतृत्वाखाली सर्व समावेशक व आक्रमक कारवाई करुन गुन्हेगांरावर विविध कायद्यातंर्गत परीणामकारक कारवाई असा होता. अपर पोलीस अधीक्षक, पालघर व सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सविस्तर सुचना दिल्या. सदरचे अभियान हे दिनाक २७/०५/२०२५ रोजी दुपारी १६.०० वाजता सुरु होऊन रात्री २४.०० वाजता संपले. हे अभियान एकुण महत्वाच्या ३ टप्यामध्ये पार पाडण्यात आले.
i) नाकाबंदी.
ii) अवैध धंद्यांवर कारवाई.
iii) कोम्बिंग ऑपरेशन गुन्हेगार लपण्याच्या वस्त्यामध्ये मोठ्या संख्येने मनुष्यबळाने जाऊन संपुर्ण क्षेत्र पिंजून काढणे व गुन्हेगारांचा शोध घेणे.
सदरचे अभियान पालघर जिल्हयामध्ये अत्यंत प्रभाविपणे राबविण्यात आले. या अभियाना दरम्यान गुन्हेगांरावर वचक निर्माण करण्यासाठी व सर्वसामान्यामध्ये सुरक्षाची भावना निर्माण होण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस दलाने १६ पोलीस ठाणे हद्दीमध्ये २५ महत्वाच्या ठिकाणी एकाच वेळी नाकाबंदी लावली होती. तसेच जिल्हयातील गुन्हेगारांच्या आश्रयस्थान असलेल्या एकुण २० वस्त्यामध्ये एकाचवेळी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
या “ऑपरेशन ऑल आऊट” अभियानामध्ये दारुबंदी कायद्याप्रमाणे ११ गुन्हे दाखल करुन ६५,३९०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, गुटखा प्रतिबंध कायद्यान्वये ०३ गुन्हे दाखल करुन ५५,२३,०५८/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, १२२ रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी करण्यात आले, भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम-१२९ प्रमाणे १, भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम-१२८ प्रमाणे १० व भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम-१२६ प्रमाणे ३८ असे एकुण ४९ व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाईचे प्रस्ताव सादर करण्यात आले. पोलीस ठाणे अभिलेखावरील २६ वॉरंट व ४८ समन्सची बजावणी करण्यात आली. तसेच मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणारे १० वाहन चालकांवर भारतीय न्याय संहिता कलम २८५ प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आले व १२९ वाहन चालकांविरुध्द मोटार वाहन कायद्याप्रमाणे केसेस करुन ५४,३०० रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे. अशी महत्वाची कामगीरी करण्यात आलेली आहे.
सदरचे ऑपरेशन हे श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. सदर ऑपरेशनव्दारे जिल्हयात गुन्हेगारांची तपासणी, मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालकांवर कारवाई तसेच जिल्हयातील अवैध धंद्यांवर कारवाई करुन त्यांचे समूळ उच्चाटन करण्यात येत आहे.
श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी जिल्हयातील अवैध धंद्यांवर कारवाई करुन त्यांचे समूळ उच्चाटन करणेबाबत अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सक्त सुचना दिल्या आहेत.