कशेळी गावात बिबट्याचा धुमाकूळ

राजापूर
सुशिल जानू तांबे
राजापुर तालुक्यातील कशेळी गावात मागील काही दिवसात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, यासाठी मागणी करण्याकरिता माजी सरपंच श्री दिपक गणपत हळदणकर साहेब गेले असता वन विभागाच्या अधिकाऱ्यांची कार्यालय बंद असल्याचे त्यांना निदर्शनास आले,असे असताना देखील श्री दिपक जी हळदणकर साहेब यांनी संयम ठेवून, सदर विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला गेला व कशेळी गावात झालेल्या सदर घटनेची सविस्तर माहिती दिली असता वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना उडवाउडवी ची उत्तर देण्यात आली असेच अद्याप तरी सदरच्या घटनास्थळी भेट दिली गेलेली नाही.

कशेळी गावातील शेतकरी श्री काशिनाथ गोकुळ हळदणकर यांच्या गोठ्यात जाऊन त्यांच्या गाई व वासरावर मोकाट बिबट्ट्याने हल्ला केला यात वासराचा बळी गेल्याने सदर शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
कशेळी गावातील बिबट्याच्या दहशतीने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गावात जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. गावातील काही ग्रामस्थांनी बिबट्याने मारलेल्या गुरांच्या नुकसानीपोटीच भरपाई मिळावी, यासाठी वनविभागाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. आवळीची वाडी, सुतारवाडी, बौद्धवाडी, दुर्गवाडी, बावकर वाडी, फोडकर वाडी, गोठणकर वाडी, आदी वाड्या कशेळी गावात येतात. गावची लोकसंख्या जवळजवळ अठराशे हून अधिक आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त ग्रामस्थ रत्नागिरी व राजापूर येथे येतात. माजी सरपंच श्री दिपक हळदणकर व स्थानिक ग्रामस्थ यांनी सांगितले, बिबट्या आम्हाला दिसतो. आजपर्यंत बिबट्याच्या जोडीने गावात अनेक ग्रामस्थांच्या गुरांचे नुकसान केले आहे. कशेळी गावातील अनेक शेतकऱ्यांचे या मोकाट बिबट्याने नुकसान केले आहे तसेंच गावातील मांजरे, कुत्री, कोंबड्या फस्त केल्या आहेत.गावातील नुकसान भरपाई साठी शेकतरी वारंवार मागणी करत आहेत.
तसेच संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष न दिल्यास माजी सरपंच व समाजसेवक श्री दिपक हळदणकर आणि ग्रामस्थ यांनी ठिय्या आंदोलन करण्याचे व सदर च्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्या बाबत सांगितले आहे.