राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे तृतीय वर्धापन दिन व महापुरुषांचा संयुक्त जयंती सोहळा जिल्हा पालघर येथे संपन्न..!

उपसंपादक : मंगेश उईके






पालघर गुरुवार दिनांक 1 में 2025 रोजी राष्ट्रीय पँथर्स आघाडी आणि राष्ट्रीय पँथर्स आघाडी माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने संघटनेचा तृतीय वर्धापन दिन तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे औचित्य साधून देशातील तमाम महापुरुषांचा संयुक्त जयंती सोहळा, कामगार मेळावा संघटनेचे सर्वेसर्वा पँथर अविश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चिंतामणी मंगल कार्यालय जिल्हा पालघर येथे मोठया दिमाख्यात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय सदस्य तथा पालघर जिल्हा अध्यक्ष पँथर संतोष जी कांबळे यांनी प्रास्तविकाचे वाचन केले. तर संघटनेचे राष्ट्रीय सदस्य तथा जिल्हा कार्याध्यक्ष पँथर ॲड. अजिंक्य म्हस्के, राष्ट्रीय सदस्या पँथर मोहिनी जाधव व संयोजक समिती सदस्य तथा लोकसभा अध्यक्ष विनायक जाधव, संयोजक समिती सदस्य तथा पालघर जिल्हा समन्वय उमेश कापसे यांनी संघटनेची वाटचाल, संघटनेची उपलब्धता, कार्य याचा विस्तृत आढावा उपस्थित कार्यकर्त्यांसमक्ष कथन केले. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय सदस्य तथा जिल्हा कार्याध्यक्ष पँथर ॲड. अजिंक्य म्हस्के यांनी आपल्या खास शैलीत सभेचे सूत्रसंचालन केले.
यावेळी पँथर अविश राऊत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात तृतीय वर्धापन दिन व कामगार दिना निमित्ताने बोलताना त्यांनी देशातील विषमतावादी व्यवस्थेवर घणाघात केला. यावेळी संविधानिक मूल्यांचा प्रसार , समतावादी व्यवस्था ,समता , स्वातंत्र्य बंधुत्व ,न्याय व्यवस्था बहुजन समाजात अगदी शेवटच्या स्तरापर्यन्त पोचविण्याचे संघटनेचे ध्येय, उद्धिष्ट व धोरण यावर मार्गदर्शन केले. संविधान व संविधानातील मूल्य , तत्वे हे संघटनेचा मूळ गाभा असून सत्ता , संपत्ती व प्रतिष्ठेपासून वंचित असलेल्या शोषित, पीडित, वंचित समूहाला सत्ता संपत्ती व प्रतिष्ठा मिळवून देऊन त्यांना उच्च स्तरावर घेऊन जाण्याचे संघटनेचे प्रथम ध्येय धोरण असल्याचे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले.
सन 2020 मध्ये झालेल्या आंदोलनात बहुजन समाजासाठी त्याग, समर्पण करणाऱ्या समाजातील 20 निष्ठावंत शिलेदार गौतम नामदेव गायकवाड, जगदीश जनार्दन राऊत, महेंद्र जनार्दन राऊत, अनिल अनंत गायकवाड, हेमंत वासुदेव कुर्ल, विशाल अरुण गायकवाड, निलेश उर्फ आशितोष श्रीधर गावंडे, वृषाली विकास भोणे, प्रियंका प्रभाकर जाधव, ललिता ललित गायकवाड, प्रियंका जयवंत जाधव, नूतन जयवंत जाधव, वैदेही विजयानंद भोणे, आनंद जनार्दन राऊत, संदीप बळवंत राऊत, संदेश मोरेश्वर मोरे, जागृत कृष्णा जाधव, सुमेध विनायक गायकवाड, अनिश दिलीप गायकवाड, ग्रीशांत घनश्याम गायकवाड या शूर सैनिकांना शूर भीमसैनिक पुरस्कार 2025 प्रधान करून सन्मानित करण्यात आले. तसेच बहुजन समाजात सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. भिमराव साखरे (फिजिक्स या विषयात Ph. D), डॉ. शिला गोडबोले पाईकराव (ग्रंथालय विज्ञान विषयात Ph.D), डॉ. भिमराव बनसोडे (इंग्रजी विषयात Ph. D), डॉ. राजू गायकवाड (क्रीडा क्षेत्रात Ph. D), आप्पा पांडुरंग लोखंडे, कल्पना ताई संदेश गायकवाड, मिलिंद बुधाजी लोखंडे, किरण हरिभाऊ जाधव, नागसेन खंडेराव गायकवाड, विकास हरी भोणे, विशाल जनार्दन भोणे, संजय वासुदेव कुर्ले या बहुजन समाज बांधवांना व भगिनींना बहुजन समाजभूषण पुरस्कार 2025 प्रधान करून सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण सोहळ्यात कार्यक्रमाचा मानबिंदू ठरला तो आदर्श ग्राम पुरस्कार 2025. राष्ट्रीय पँथर्स आघाडीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्ताने यंदाचा प्रतिष्ठित समजला जाणारा मानाचा आणि सन्मानाचा आदर्श ग्राम पुरस्कार 2025 मौजे टेंभोडे या गावाला प्रधान करून गावाचे सन्मान करण्यात आले. तसेच दैदिप्यमान सोहळ्याला निमंत्रित असलेले समाजातील ॲड. सुरेश जी महाडिक (पालघर) , अनिल अनंत जाधव (पास्थळ), संजय राजाराम जाधव (बावडे), वंदना किरण जाधव (टेंभोडे), महावीर जगताप (पालघर) या मान्यवरांना सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
दरम्यान दुसऱ्या सत्राची सुरुवात दुपारी 2.00 वाजता सामूहिक भोजनाने झाली. दुपारी 3.00 वाजता मुंबई येथून आलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना आणि स्थानिक नृत्य स्पर्धांचे आयोजित तसेच कार्यक्रमात अनेक सांस्कृतिक, सामाजिक , प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रीय कोर कमिटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अरशद खान, राष्ट्रीय महासचिव जगदीश राऊत, राष्ट्रीय सचिव बिंबेश जाधव, राष्ट्रीय सहसचिव लहानु डोबा, राष्ट्रीय कोषाध्यक्ष भरत महाले, राष्ट्रीय सदस्य भावेश दिवेकर, राष्ट्रीय सदस्या भारतीताई राऊत, मोहिनी ताई जाधव, राष्ट्रीय सदस्य तथा पालघर जिल्हाध्यक्ष संतोष जी कांबळे, राष्ट्रीय सदस्य तथा पालघर जिल्हा कार्याध्यक्ष विद्रोही कवी अजिंक्य विद्याधर मस्के, राष्ट्रीय सदस्य चंद्रसेन ठाकूर तसेच संयोजक समिती सदस्य रोहित चौधरी, शिवप्रसाद कांबळे, संयोजक समिती सदस्य तथा पालघर जिल्हा लोकसभा अध्यक्ष विनायक जाधव, संयोजक समिती सदस्या स्नेहा ताई जाधव, संयोजक समिती सदस्य तथा पालघर जिल्हा समन्वय उमेश कापसे, संयोजक समिती सदस्य तथा पालघर तालुका अध्यक्ष किशोर राऊत, संयोजक समिती सदस्य तथा पालघर जिल्हा महासचिव लक्ष्मण रखमे तसेच जिल्हा कार्यकारणी , सर्व तालुका अध्यक्ष व तालुका कार्यकारणी , विभाग, शाखा कार्यकारणी व कार्यकर्ते हजारोंच्या संखेने उपस्थित होते. व सर्वांच्या प्रयत्नांनी कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला.