पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील उद्योजकांशी चर्चा !!!

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय
दि १२ ठाणे
उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ठाणे पोलिसांची- सहपोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांचे आश्वासन.
ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन च्या पदाधिकारी तसेच शहरातील संस्थेच्या उद्योजक सदस्यांशी नुकतीच सह पोलीस आयुक्त डॉ ज्ञानेश्वर चव्हाण यांनी साधला संवाद . त्या समयी अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख,पोलीस उपयुक्त परिमंडळ ५ प्रशांत कदम,पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज सिरसाठ , शिवाजी गवारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वागळे इस्टेट व इतर अधिकारी उपस्थित होते.
ठाणे ही उदयोग नगरी म्हणून प्रसिद्ध आहे सध्या शहराची संख्या झपाट्याने वाढत आहे. आर्थिक राजधानी लागूनच महत्त्वाचे शहर असून, ठाण्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी प्रामुख्याने ठाणे पोलिसांची असून, उद्योजक आणि व्यापारी यांच्या समवेत सातत्याने सुसंवाद घडवून त्यांच्यामध्ये एक विश्वासार्हता निर्माण करणेसाठी समन्वय सातत्याने आयोजित केला जाणार असल्याचे आश्वासन देतांना ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन सारख्या क्रियाशील संघटनेने उद्योजकांमध्ये जागृती निर्माण करून कोणतीही घटना घडल्यास सदर बाब सम्बधित पोलिसांच्या ११२ नंबर अथवा प्रत्यक्ष निदर्शनास आणावी असे सह पोलिस आयुक्त डॉ ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले.
शहरातील विविध प्रकारच्या उदयोग आणि व्यावसायिक अस्थापना यांच्यामध्ये सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करणे, गुंतवणुक आणि व्यवसाय सुलभीकरणासाठी चालना देणे, शाश्वत विकासासाठी स्थानिक पातळीवर विश्वासहर्ता वाढविणे, विविध क्षेत्रातील गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे, कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेणे, उद्योजक आणि पोलिस यांच्यामध्ये नियमित सुसंवाद साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंतर्गत “ ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स” आणि ठाणे पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने “पोलीस, उद्योजक सुसंवाद कार्यक्रम” ठाणे विभागाचे सह पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दि. ८ एप्रिल २०२५ रोजी सायं. ४.३० वाजता, पोलीस मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होता. या कार्यक्रमास ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्सचे मानद महासचिव भावेश मारू आशिष शिरसाट उपाध्यक्ष, नोव्होनिल गुहा कोषाध्यक्ष , कीर्ती पांचाल, निखिल सुळे ,अंजुम काझी ,कार्यकारी समिती सदस्य मेहुल मेहता,एकनाथ सोनवणे कार्यकारी सचिव तसेच अनेक प्रतिथयश उद्योजक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. भावेश मारू मानद महासचिव यांनी प्रास्ताविक करतांना संस्थेबद्दल माहिती दिली. आशिष शिरसाट उपाध्यक्ष ह्यांनी उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी सांगितल्या एकनाथ सोनवणे कार्यकारी सचिव ह्यांनी मा सह पोलीस आयुक्त ह्यांनी ठाणे जिल्ह्यातील व शहरातील उद्योगांची माहिती दिली. निखिल सुळे, कीर्ती पांचाल अंजुम काझी कमिटी मेंबर ह्यांनी त्यांना आलेल्या अडचणी बाबत अवगत केले.
ठाण्यातील उद्योजकांना खंडणीच्या माध्यमातून त्रास देत असेल तर ते जराही सहन केले जाणार नाही तसेच माथाडी कामगारांकडून अशा पद्धतीचे वर्तन होत असेल तर त्याबाबत निश्चितच दखल घेतली जाईल ठाण्यातील उद्योजकांना सुरक्षित आणि उद्योग वाढीसाठी योग्य वातावरण निश्चितच देऊ असा विश्वास सह पोलीस आयुक्त डॉ ज्ञानेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केला. माथाडी संघटनांच्या नावाने गुंडांचा खंडणीसाठी होणारा त्रास कदापि खपवून घेतला जाणार नाही आणि त्याविरोधात तत्परतेने कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस ठाण्यांना दिल्याचे आणि आश्वासित केले.
ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन च्यावतीने श्री मारू मानद महासचिव उपाध्यक्ष आशिष शिरसाट
यांनी पोलिसांनी वेळोवेळी उद्योजक, व्यापारी आणि व्यवसायिकांना केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.
भारताचे स्वप्न साकार करावयाचे असल्यास उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार करणे गरजेचे आहे त्यांना येणा-या अडी-अडचणी सोडविण्यासाठी शासनाने आखलेले धोरण हे स्वागतार्ह आहे परंतु पोलिसानी त्यांना वेळोवेळी सहकार्य करावे असेही श्री मारू म्हणाले
जेणेकरून विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारटाकरिता आपण निश्चितच हातभार लावू असेही प्रतिपादन कीर्ती पांचाल व निखिल सुळे कमिटी मेंबर यांनी केले.