बिहार येथील महाबोधी महाविहार बुद्धगया विहार मुक्तीसाठी रिपाईच निवेदन..

उपसंपादक-मंगेश उईके
पालघर




बिहार राज्यातील बुद्धगया येथे महाबोधी महाविहाराच्या मुक्ततेसाठी बौद्ध भिक्खू संघाने गेल्या २० ते २५ दिवसापासून आंदोलन सुरू केले असून त्या आंदोलनात अनेक बौद्ध भिक्खूंची तब्येत चिंताजनक असताना शासनाने आजपर्यंत कोणतीही ठोस निर्णय किंवा कारवाई केलेली नाही. यामुळे संपूर्ण जगभरात तीव्र संतापाची लाट उसळली असून नाराजीचा सूर आहे. सन १९४९ रोजी चे टेम्पल अॅक्ट अधिनियमन तातडीने सुधारणा करून संबंधित महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या हाती सोपविण्यात यावे. यासाठी पालघर जिल्ह्यात बहुजन समाज अन्याय अत्याचार संघर्ष समितीच्या वतीने पालघर येथील पाचबत्ती येथे सदर घटनेचा तीव्र निषेध करून निवेदन देण्यात आले.
यावेळी वरील विषयासंदर्भात निषेध करीत संबंधित विषय तातडीने मार्गी लावण्याकरिता रिपाई (आ )पालघर जिल्ह्याच्या वतीने सुद्धा मा.महामहिम राष्ट्रपती महोदया , मा.महामहीम राज्यपाल महोदय ( महाराष्ट्र राज्य ), मा.मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य), मा. मुख्यमंत्री (बिहार राज्य) यांना निवेदन मा. जिल्हाधिकारी श्री गोविंद बोडके साहेब यांच्याकडे देण्यात आले. यावेळी रिपाई (आ ) चे पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, राष्ट्रीय पॅंथर संघटनेचे नेते अविष राऊत व त्यांचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे निलेश गावंडे व त्यांचे पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेचे दत्तात्रेय जाधव, श्रीपाद शेलार, शामराव खरात, सिद्धेश जाधव, पालघर डहाणू तालुका बौद्ध युवक मंडळाचे विनोद मोरे, आप्पा लोखंडे, जगदीश जाधव, सामाजिक कार्यकर्ते छबिलदास गायकवाड, किरण जाधव,मिलिंद लोखंडे, विकास शेलार,सी.पी.एम.चे हर्षल लोखंडे रिपाईचे शरद जाधव,राम ठाकूर,राजू शेख, राजकुमार यादव, संजय पाटील, राजेश उपाध्याय, संजोग उपाध्याय,वर्षा उंबरठा, विमल चौधरी,सुरेखा नम,हर्षला धानवा, सुनिता राथड,पुष्पराज फुलारा, कुंदन मोरे तसेच समाज बांधवांसोबत विविध पक्ष, संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी व शेकडो बहुजन बांधव उपस्थित होते.