साई सेवा प्रतिष्ठान प्रस्तुत श्री देव कातलेश्वर कलापथक मार्फत कोकणची लोककला म्हणजे बहुरंगी नमन सादर

प्रतिनिधी-सुशील तांबे
राजापूर परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणभूमीत अनेक कलांचा विकास झाला आहे. त्यामध्ये नमन(खेळे), शक्तीतुरा (जाकडीनृत्य), भारुड, डफावरील पोवाडे इ.कलांचा समावेश आहे. कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्हातील नमन (खेळे) या लोककलेची प्रसिध्दी जगभर पसरली आहे. श्री गणरायाचे आगमन, मृदंग, ढोलकीच्या तालावर ठेका धरणारी नटखट गवळण, काल्पनिक पौराणिक वगनाट्य सादर करणारी ही नमन लोककला कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना, शासनाचे अनुदान नसतानाही कोकणवाशीय जोपासत आहेत. राजापूर तालुक्यातील कशेळी गावातील दुर्गवाडी येथील निवडक कलाकारांच्या कलाकृतीने नटलेले आणि प्रथमच स्त्री कलाकारांच्या कलागुणाने संपन्न असलेले कोकणातील लोकप्रिय साई सेवा प्रतिष्ठान प्रस्तुत श्री देव कातलेश्वर कलापथक यांनी कोकणची लोककला म्हणजे बहुरंगी नमन विघ्नेश्वर मित्र मंडळ हळदणकर वाडी येथे सादर करून कोकण वासियांच्या व रसिकप्रेक्षकांच्या मनात स्थान प्राप्त केले असून कोकणचा वारसा जपला आहे. सदर कार्यक्रमाला साई सेवा प्रतिष्ठान चे संस्थापक श्री सुशिल जानू तांबे,वाडीप्रमुख श्री सुरेश भोसले,गावकर श्री विलास भोसले,श्री सुरेश भातडे,श्री रविंद्र भोसले व श्री मंदार तांबे,श्री अरुण तांबे व इतर वाडी बांधवांचे सहकार्य लाभले..तसेच शाहीर रोहित प्रकाश भातडे व सहशाहिर यश रवींद्र भोसले यांनी आपल्या मधुर ,सुरेल ,आवाजाने रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करून. एक नवीन आदर्श घालून दिला, ढोलकी पटू श्री दिनेश तांबे,साऊंड व लाईट सिस्टम श्री मनोज (बाय)भोसले, बुलबुल श्री नांदगावकर अशा अनेक नमनप्रेमिंचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले . सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहात सदर कार्यक्रमाला प्रतिसाद दिला,व साई सेवा प्रतिष्ठान चे संस्थापक श्री सुशिल जानू तांबे यांनी सर्व रसिक प्रेक्षकांचे व विघ्नहर्ता मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी ,यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.