पालघर येथील स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मा यांना विशेष अभिवादन…

0
Spread the love

उपसंपादक- मंगेश उईके

पालघर :-दि. 14 : ब्रिटीश साम्राज्या विरोधातील चलेजाव चळवळीत सहभागी झालेल्या पालघर तालुक्यातील पाच स्वातंत्र्य सैनिकांना हुतात्म्य प्राप्त झाले होते.

त्यांचे पुण्यस्मरण व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पालघर येथील हुतात्मा स्तंभ येथे आज हुतात्मा यांना आदरांजली वाहण्यात आली. सर्व मान्यवरांनी हुतात्मा स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

आज पालघर शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. हुतात्मा चौकाजवळ जिल्ह्यातील काशिनाथ हरी पागधरे (सातपाटी), गोविंद गणेश ठाकूर (नांदगाव), रामप्रसाद भीमाशंकर तिवारी, (पालघर), सकूर गोविंद मोरे (सालवड), रामचंद्र महादेव चूरी (मुरबे ) यांना 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यात याच दिवशी हुतात्म्य आले होते.

आज हुतात्मा यांना आदरांजली वाहण्यासाठी येथील हुतात्मा चौकात पालघर जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रकाश निकम, आमदार श्रीनिवास वनगा, माजी खासदार राजेंद्र गावित जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी भानुदास पालवे, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील तसेच विविध विभागातील अधिकारी वर्ग, हुतात्मा यांचे नातेवाईक, नागरिक, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट