सांगलीच्या बहिणीनी राखी बांधल्या नंतर जवानांचे आश्रु झाले अनावर..!

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :-आपल्या लाडक्या बहिणींना जवानांनी निरोप देऊन झाले रवाना.
सांगली येथील सैनिक संकुल पुष्पराज चौक सांगलीत गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आल्याने पाण्याची पातळी वाढत होती त्यामुळे इंडियन आर्मी सैन्य दल सांगली मध्ये दाखल झाले होते,मात्र आत्ता पूर परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे इंडियन आर्मी जवान पुन्हा ड्युटीवर रवाना होत असल्याने. याच अनुषंगाने सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जवानांना जयश्रीताई पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित आपुलकी रेस्क्यू टीम कडून इंडियन आर्मी जवानांना राखी बांधण्यात आली.





यावेळी जयश्रीताई पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाल्या काही दिवसावर रक्षाबंधन सण येत असल्याने आपल्या भारत मातेच व आपल्या सर्व भारतीयांचं रक्षण करणाऱ्या आपल्या जवानांना दीर्घायुष्य मिळो म्हणून त्यांच्या मनगटावर राखी बांधून त्यांना आशीर्वाद देऊन रक्षाबंधन औक्षण करून राखी बांधून साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जवानांचे अश्रू अनावर झाले व त्यांनी आपुलकी रेस्क्यू टीमचे कौतुक केले व आभार मानले व आपल्या बहिणींना निरोप देऊन रवाना झाले..
यावेळी उपस्थित जयश्रीताई पाटील, रोहीत जाधव, सागर खंडागळे, अझहर लांबे,सागर शिंदे, कैलास पिसे, ओंकार राजपूत,महेशकुमार मठ,सागर मस्कर,गजानन बुलबुले,मिलिंद मोडकर,यश साळुंखे, रतनसिंग राजपूत,विशाल दौडे,यश पाटील, निलेश शिंदे, विवेक पाटील,अर्चना घाडगे, पूनम पिसे, वैशाली बुलबुले, श्रुती बुलबुले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com