जव्हार पोलिसांनी आठ लाखांच्या गांजासह दोघांना ताब्यात घेतले आहे…

प्रतिनिधी. मंगेश उईके
पालघर जिल्हा :– जव्हार तालुक्यात नाकाबंदी करताना जव्हार पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ६ वाजता शिवनेरी ढाबा येथे सुमारे आठ लाखांच्या गांजासह १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करत धडक कारवाई केली. भाजीपाल्याच्या कॅरेटमधून ही वाहतूक होत होती.
जव्हार शहरातील शिवनेरी नाका येथे नाकाबंदी करताना एका पिकअप वाहनाची झडती घेण्यात आली. यात भाजीपाल्याचे प्लास्टिक कॅरेट आढळले. या वेळी पोलिसांना संशय आल्याने गाडीची तपासणी केली असता सहा प्लॅस्टिकच्या कॅरेटमध्ये ३१ किलो ८६८ ग्रॅम अमली पदार्थ गांजा आढळला. त्याची किंमत सात लाख
९७ हजार चारशे पन्नास रुपये इतकी आहे. तसेच पिकअप व इतर साहित्य मिळून १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुनील तुकाराम आर्य (२४), श्रीराम दिनेश सोलंकी (२१) या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते दोघेही मध्यप्रदेश येथील रहिवासी असल्याचे जव्हार पोलिस ठाणे प्रभारी पोलिस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांनी सांगितले.
या वेळी जव्हार पोलिस उपनिरीक्षक अनिल दिघोळे, वाहतूक विभागाचे एस. आय. सालकर, प्रदीप विटकर, नंदकुमार गायकवाड, सोपान भोगाडे, कैलास राठोड आदी टीम यांनी कामगिरी बजावली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com