विशाळगड वादाच्या पार्श्वभुमीवर सांगली जिल्हयातील पोलीस ठाणे हद्दीत संचलन…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :-मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली जिल्हयातील सर्व जनतेला आवाहन केले आहे की, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता व सलोखा राखावा. सोशल मिडीयावरुन आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर सायबर पोलीस ठाणेकडून लक्ष ठेवले जात आहे. आक्षेपार्ह संदेश/स्टेटस ठेवणाऱ्या लोकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

कोल्हापुर जिल्हयात विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या वादाच्या पार्श्वभमीवर सांगली जिल्हयात शांतता रहावी यासाठी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे हद्दीमध्ये रुट मार्च काढण्यात आला. सदर संचलनाकरीता पोलीस ठाणेतील अधिकारी, अंमलदार, दंगल नियत्रंण पथक, जलद कृती दलाची पथके व राज्य राखीव पोलीस दलाची पथके सहभागी झाली होती. तसेच महत्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

तसेच पोलीस ठाणेस पोलीस पाटील व शांतता कमिटी सदस्यांच्या मिटींग घेण्यात आल्या आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट