भाजपा युवा मोर्चा खा.तटकरेंच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलणार – जिल्हाध्यक्ष निलेश थोरे

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड:- माणगांव :-रायगड दक्षिण च्या भारतीय जनता युवा मोर्चाने महायुतीचे उमेदवार खा.सुनिलजी तटकरे यांच्याकरीता कंबर कसली असून तटकरेंच्या विजयामध्ये युवा मोर्चा मोलाचा वाटा उचलणार असल्याचे प्रतिपादन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाजपा युवानेते निलेश थोरे यांनी केले, व्यापक राष्ट्रहिताचा विचार करत असताना महायुतीने दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सन्मा.खा.सुनिलजी तटकरे यांना ३२ रायगड लोकसभेमधून बहुमतांनी निवडून आणणे ही सर्व मित्रपक्षांची जबाबदारी असून भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विचारधारेवर काम करणारा खासदार छत्रपतींच्या भूमिमधून निवडून जाणे गरजेचे आहे त्याकरिता युवकांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त मतदारांना महायुतीला मतदान करण्याकरिता सज्ज करावे लागेल.
आज भारत देश हा युवा देश असून सगळ्यात जास्त मतदार हे १८ ते ४५ वयोगटातील आहेत,युवकांमध्ये मोदीजींची कमालीची लोकप्रियता असून मोदी सरकारने मागील १० वर्षात राबवलेल्या विविध कल्याणकारी योजना व राष्ट्रहिताचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही युवा मोर्चाने खांद्यावर घेतलेली आहे.मतदानाच्या दिवशी प्रत्येक बूथ वरील एक एक मतदार हा मतदान केंद्रावर कसा पोहोचेल याचे नियोजन करून मतदानाचा टक्का वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.खा.सुनिलजी तटकरे हे विकासनशील दृष्टीकोन असणारे नेते असून मोदीजींच्या सरकार मध्ये सहभागी होणार असल्याने जास्तीत जास्त निधी हा रायगड-रत्नागिरी तील जनतेच्या विकासाकरिता आणू शकतील.भारतीय जनता पक्ष व समविचारी पक्षाचे जिथे जिथे लोकप्रतिनिधी निवडून येतात तिथे प्रचंड अशी विकासकामांची पायाभरणी होत असते त्यामुळे रायगड मध्येही तटकरे साहेबांच्या रुपाने महायुतीचा खासदार निवडून येणे ही भविष्यात विकासाची दारे उघडण्याची सुवर्णसंधी असणार आहे त्यामुळे महायुतीच्या प्रचारात युवा मोर्चाने आघाडी घेतलेली असून मतदान केंद्रावर देखील भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते धडाडीने काम करून प्रत्येक बूथ ५१% पर्यंत नेऊन ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे.युवा मोर्चाने नमो युवा चौपाल,कॉफी विथ युथ,नवंमतदाता संपर्क अभियान अश्या अनेक उपक्रमाद्वारे नव मतदार व युवा मतदारांशी संपर्क साधत मोठ्या प्रमाणावर भाजपा व मोदीजींचे राष्ट्रहिताचे विचार युवावर्गात पोहोचवले असून तरुणांचा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे,जिल्ह्यातील हजारो युवकांशी आतापर्यंत केलेला संपर्क व त्यांच्याशी सततची असलेली कनेक्टिव्हिटी याच्या जोरावर त्यांच्या राष्ट्रहिताच्या भावना ह्या मतांमध्ये परिवर्तीत करायला आम्हाला नक्कीच यश मिळेल असा ठाम विश्वास आहे.
आताचा युवा हा परंपरागत चालत आलेले जाती,धर्माचे विचार बाजूला ठेऊन भारताला सशक्त भारत करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे नरेंद्रजी मोदी यांच्या पाठीमागे उभा राहील व रायगड मध्ये जाती,समाजाच्या नावाने लोकांना भावनिक करून मतं मिळवण्याचा विरोधकांचा डाव उधळून लावण्यात लोकसभा मतदार संघातील तरुणवर्ग यशस्वी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जिल्ह्यातील तरुण मतदारांसोबत युवा मोर्चाचा मागील वर्षभर सतत असणारा संपर्क हा खा.सुनील तटकरेंच्या पथ्यावर पडणार असून त्यांच्या विजयामध्ये तरुणांचे योगदान निर्णायक राहणार असल्याचे मतं त्यांनी यावेळी व्यक्त केले.प्रसंगी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रितेश मुंढे,जिल्हा सरचिटणीस रोशन चाफेकर,जिल्हा उपाध्यक्ष निलेश मांदाडकर,गणेश पाटील,परेश सांगळे,जिल्हा चिटणीस भास्कर पार्टे,राकेश पवार,नरेश कोकरे,अलिबाग युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष निखिल मंगेश चव्हाण,महाड विधानसभा युवा मोर्चा अध्यक्ष ऍड.सूरज जामदार उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com