बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर २९ मार्च पदस्पर्शदिन म्हणून सफाळे वेढी गाव या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरा …

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

सफाळे :-हा पदस्पर्शदिन शांतीपूर्वक आनंदमय वातावरणात कार्यक्रम करण्यात आला.

विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे क्रांतीची मशाल होती, आणि त्याच क्रांतीच्या मशालीचा प्रकाश पालघर जिल्ह्याला मिळाला, ही अभिमानाची बाब आहे.

आपल्या पालघर जिल्ह्यात सफाळे जवळच वेढी ‘ या गावी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची परिवर्तनशील, अंधारातून प्रकाशाकडे नेणारी, मानसिक गुलामीतून स्वातंत्र्याकडे नेणारी ऐतिहासिक परिषद झाली होती. जसे आभाळ महंटले की सूर्य आहे.व, अग्नी म्हंटल की ज्वाला आहेच. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की संघर्ष आहेच.

असाच संघर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आणि तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील त्यांच्या सहकाऱ्यांना करावा लागला होता, तो असा की दिनांक २९ मार्च १९३६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या सहकाऱ्यांसोबत मुंबईतुन त्या वेळी या गावी यायला निघाले. स्थानिक लोक बाबासाहेब येणार म्हणून उत्साही होते. त्या दृष्टीने त्यांनी पूर्वतयारी केली होती. ‘सफाळे रेल्वे स्थानक’ ते कार्यक्रम स्थळी’ जाण्याकरीता मोटार लौरीची व टांग्याची १-२ दिवस अगोदर सोय करून ठेवली होती. परंतु परिषदेच्या आदल्या दिवशी टांगाचालकांची बैठक झाली. काही कर्मठ स्पृश्य लोकांच्या चिथावणीवरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मोटार लॉरी आणि टांग्यात न बसवण्याचा ठराव मंजूर झाला, परंतु संपातील मुसलमान समाजाचा टांगाचालक संपातून फुटला, त्याच बरोबर ३ भंडारी
जातसमूहाचे टांगेवाले संपातून फुटले, आणि भाडी घेण्यास
तयार झाले.

नियोजनाप्रमाणे १२ वाजता ऐतिहासिक परिषदेला प्रारंभ झाला, वेढी गावातील सभामंडप सर्व बाजूनी शृंगारला होता, ३- ४ हजार अस्पृश्य समुदाय उपस्थित होता. आणि त्यात क्रांतीचा सूर्य म्हणजेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ उपस्थिताना संबोधित करीत होते.

बाबासाहेबांसोबत कमलकांत चितत्रे संभाजीराव गायकवाड, वाघ, मडकेबुवा जाधव, अनंतराव चित्रे, शांताराम पोतनीस, चांगदेव मोहिते, बापूसाहेब सहस्रबुद्धे, रामचंद्र मोरे, केणी, जे पी वनमाळी असे कार्यकर्ते होते, त्या परिषदेत अनेक ठराव मंजूर झाले. स्थानिक कार्यकत्यपैिकी लक्ष्मण जानवा गायकवाड, गंगाराम माधव जाधव, जनार्दन पदमाजी लोखंडे, मोरे, धोंडीराम गायकवाड, लक्ष्मण मानोजी गायकवाड, गोपाळ महादेव जाधव, सदाशिवराव साळवी, दिवाकर पगारे इत्यादी मंडळी सक्रिय होती. त्यावेळी असा अव्यभव्य कार्यक्रम झाला होता.

शुक्रवार दी.२९ मार्च २०२४ रोजी पालघर व इतर पालघर जिल्ह्यातील भागातून बहुसंख्येने बहुजन समाज या वेढी येथील पावनस्थली बहुसंख्याने भीम बांधवांनी भेट देण्यात आली. तसेच समता सैनिक दल, व यावेळी काही भीम बंधू भगिनी पालघर होऊन चालत वेढी गावा पर्यंत चालत आले. बऱ्याच गावकऱ्यांनी नाश्ता व पाण्याची सोय सुद्धा केली होती.तसेच भीम बंधू भगिनी सफाळ्याला पोहोचले असता ज्या टांग्यातून बाबासाहेबांनी वेढी गावापर्यंत प्रवास केला होता त्याच टांग्यामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा ठेवून वेढी गावापर्यंत प्रवास करत आणला.व तसेच बुद्ध वंदना घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले,तसेच वेढी गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने वेढी या गावात स्तंभ उभारण्यात आलेला आहे.व तसेच बहुतांश पालघर जिल्ह्यामध्ये पहिले बुद्ध विहार बांधण्यात आले असावे म्हणून वेढी हे गाव पर्यटक स्थळ म्हणून नोंद करण्यात आली आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेबांची स्मृती उभारण्यात यावी असे ग्रामस्थ व समाज बांधवांचे प्रशासनाला विनंती आहे.

तसेच बाबासाहेबांच्या स्मृती आणि विचार पुन्हा जागृत करन्यात आले . त्याचबरोबरीने तत्कालीन कार्यकर्ते, स्थानिक लोक, ज्या लोकांनी या परिषदेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्यांच्या स्मृतीप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे मोठ्या बहुसंखयाने भीमसैनिकानी लाभ घेतला. तसेच वेढी गावातील कमिटी, मंडळीकडून व समाज बांधवानी केलेले श्रम व कार्यक्रमाचे नियोजन यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल समाज बांधवांनी आभार व्यक्त केला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट