महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत वसई खाडीमध्ये वसई ते भाईंदर दरम्यान ” प्रायोगिक तत्त्वावर ” रो-रो प्रवासी फेरीबोट सेवा सुरू होणार…!

प्रतिनिधी-मंगेश उईके
भाईंदर:- दि. २० फेब्रुवारी २०२४ पासून सुरु करण्यात येत आहे. ह्या फेरीबोटीचे सुरक्षित व सुलभ नौकानयन, जेट्टी व बोटीमधून प्रवासी आणि वाहनांची सुलभ चढ-उतार आणि सुयोग्य नौकानयन मार्ग या सर्व बाबींची खात्री झाल्यानंतर, ह्या फेरीबोट सेवेचा लोकार्पण सोहळा औपचारिकरित्या करण्यात येईल.
अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या ह्या रो-रो फेरीबोट सेवेमुळे भाईंदर आणि वसई ही शहरे एकमेकांशी जलमार्गाने जोडली जाणार आहेत.
मेसर्स सुवर्णदुर्ग शिपींग अँड मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीस ही रो-रो फेरीबोट सेवा चालविण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने परवानगी दिली असून, एकाच फेरीत १०० प्रवासी आणि ३३ गाड्या वाहून नेण्याची फेरीबोटीची क्षमता आहे.
ह्या कंपनीला कोकण किनारपट्टीवर राजपुरी, बाणकोट, दाभोळ आणि जयगड या खाड्यांमध्ये रो-रो फेरीबोट सेवा चालविण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. वसई ते भाईंदर या फेरीबोट सेवेकरिता सध्या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर पुढीलप्रमाणे तिकीट दर ठेवण्यात आले आहेत:
प्रवासी आणि वाहनांचा तपशील
तिकीट दर
मोटारसायकल (चालकासह)
रु. ६०/-
रिकामी तीन चाकी रिक्षा मिनीडोर (चालकासह)
रु. १००/-
चारचाकी वाहन (कार) (चालकासह)
रु. १८०/-
मासे, पक्षी, कोंबडी, फळे इ. (प्रति टोपली) व कुत्रा, शेळी, मेंढी (प्रति नग)
रु. ४०/-
प्रवासी प्रौढ (१२ वर्षांवरील)
रु. ३०/-
प्रवासी लहान (३ ते १२ वर्षांपर्यंत)
रु. १५/-
सध्या ही फेरीबोट सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरु होणार असली तरी, वाहतूककोंडीचा सामना करीत वसई ते भाईंदर असा रस्त्याने प्रवास करणा-या लोकांना वेळ व इंधनाची बचत करणारा, प्रदूषणमुक्त, पर्यावरणस्नेही व आरामदायी असा जलवाहतूक सेवेचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने जनतेसाठी ही सेवा नक्कीच दिलासादायक ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र सागरी मंडळास वाटत आहे. अशी माहिती
डॉ. माणिक गुरसळ (भाप्रसे) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई यांनी दिली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com