!!वकील मोर्चा!! चलो अहमदनगर -वकिलांवर वारंवार होणाऱ्या हल्लाविरोधात..!

0
Spread the love

संपादिका – दिप्ती भोगल

अहमदनगर:- अहमदनगर शहर बार असोसिएशन व सर्व तालुका बार चे सर्व वकिलाचा भव्य मोर्चा दि ९/२/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता अहमदनगर जिल्हा न्यायालय ते अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय वर निघणार आहे

शासन दरबारी मागणी: १)राहुरी येथे आपले बंधू व भगिनी स्व.आढाव दाम्पत्याची हत्या प्रकरणी उज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात यावी
२) आरोपी विरुद्ध मोक्का लावण्यात यावा
३) वकील संरक्षण कायदा लागू करण्यात यावा

पार्किंग व्यवस्था :

पार्किंग क्र.१ जिल्हा न्यायालय समोरील कॅन्टीन मध्ये राहुरी,नेवासा,श्रीरामपूर,संगमनेर,राहता येथील वकील बांधव यांनी पार्किंग करण्यात यावी

पार्किंग २ : जिल्हा न्यायालय मधील डाव्या बाजूकडील पार्किंग मध्ये पारनेर श्रीगोदा,कर्जत,जामखेड,पाथर्डी,येथील वकिलांनी पार्किंग करावी

पार्किंग ३:
जिल्हा न्यायालयातील उजव्या बाजूकडील पार्किंग मध्ये अकोले,कोपरगाव,शेवगाव, अहमदनगर येथील वकिलांनी पार्किंग करावी

सूचना:
१) सर्व सन्मानित वकीलासाठी नाश्ता व चहा पाण्याची व्यवस्था केली आहे
२)सर्व सन्मानित वकिलांनी ड्रेस कोड मधे येणे व काळा कोट असणे आवश्यक
३) जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना सर्व बार चे अध्यक्ष हे जातील

ह्या मोर्चाचे आयोजन
अहमदनगर बार असोसिएशन यांनी केले असल्याची माहिती वकील श्री. अमर घोसाळे यांनी दिली.

तसेच याबाबत महाराष्ट्रातील असंख्य वकिल बार असोसिएशनने आपले सहकार्य असल्याचे कळविले आहे . तरी याबाबत त्यांनी सरकारी वकील श्री उज्वल निकम,गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस तसेच श्री , अजित पवार यांना निवेदन दिले असून लवकरच मा.मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांची भेट घेणार आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट