२६ / ११ च्या आतंकवादी हल्ल्यात साक्षीदार असलेल्या पो. उप.नि. श्री.जाधव यांचा कोण बनैगा करोडपती कार्यक्रमात विशेष सन्मान…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई :-सातारकरांसाठी अभिमानास्पद…!

दिनांक 26/11/2024 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सोळा वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने कोण बनेगा करोडपती, या कार्यक्रमास मुळचे सातारा जिल्ह्यातले परंतु सध्या मुंबई मध्ये कर्तव्यास असणारे अरुण जाधव यांना चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आले होते, सदरचा कार्यक्रम उद्या दिनांक 26/11/2024 रोजी (Sony Tv) सोनी टीव्ही वरती कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमांमध्ये दाखवला जाणार आहे, तरी सर्वांनी कार्यक्रम पहा.

अरुण जाधव (राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक सन्मानित)
Police Sub Inspector (Mumbai City)

२६/११ ला स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता अतिरेक्यांशी दोन हात करणारा सातारचा वाघ #अरुण जाधव…. २६/११ ला झालेला अतिरेकी हल्ला ही संपूर्ण भारतीयांच्या हृदयावरील भळभळती जखम आहे आज या घटनेला 16 वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यात क्रूरकर्मा अतिरेकी अजमल कसाब ला पकडण्यासाठी तुकाराम ओंबळे सरांनी गाजवलेले शौर्य समस्त सातारकर कधीही विसरणार नाहीत. याच २ रात्रीच्या भयाण युद्धात अजून एक आपला सातारचा मावळा आपला प्राणाची पर्वा न करत लढत होता… छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये रक्ताची होळी खेळून झाल्यावर कसाब आणि त्याच्या साथीदार बाहेर पडले… ते कामा हॉस्पिटल च्या दिशेने गेल्याची खबर पोलिसांना मिळाली होती तेव्हा महाराष्ट्र पोलीस दलातील मोठे अधिकारी करकरे साहेब कामटे साहेब आणि साळसकर साहेब आणि साथीदार यांनी त्यांचा पाठलाग करायचे ठरवले. साळसकर साहेब स्वतः गाडी चालवत होते. कामा हॉस्पिटल च्या गल्लीत छोटा रस्ता असल्यामुळे अतिरेक्यांचा अंदाज घेत गाडी पुढे जात होती. रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडा आड हे अतिरेकी लपून बसले होते त्यांनी पोलीस गाडी पाहून गाडीच्या दिशेने बेछूट गोळीबार करायला सुरवात केली.

अचानक झालेल्या गोळीबारात समोर बसलेले कामटे साहेब जबर जखमी झाले. साळसकर साहेबांनी गाडीवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला परंतु अतिरेक्यांच्या गोळ्यांनी गाडीचा टायर च पंक्चर झाला आणि अतिरेक्यांनी डाव साधला बेफाम गोळ्यांनी गाडीची अक्षरशः चाळण झाली.

कामटे,साळसकर,करकरे शहीद झाले बरोबर चे साथीदार पण शहीद झाले…. त्याच गाडीत एक आपल्या सातारचे जवान होते अरुण जाधव…. सातारकरांना त्यांच्या विषयी खूप कमी माहिती असेल किंवा कदाचित नसेलही.

अतिरेक्यांनी गोळीबार केल्यानंतर समोरच्या सीट वर बसलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांना गाडीच्या बाहेर टाकले आणि तीच गाडी घेऊन निघाले होते. जेव्हा गोळीबार झाला तेव्हा एक सहकारी जाधव यांच्या अंगावर पडला आणि त्याच्या खाली जाधव दबले गेले. समोर मृत्यू स्पष्ट दिसत होता पण जाधव तसेच पडून होते.

कसाब त्यांना स्पष्ट दिसत होता त्यांच्या मुठी अवळत होत्या त्यांनी बंदूक जवळ करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या खांद्या मधून गोळी आरपार गेली होती हात उचलत न्हवता. त्याचवेळी गाडीत असणाऱ्या एका सहकाऱ्याचा मोबाईल वाजला आणि त्या अतिरेक्यांनी परत तीन चार राऊंड फायर केले त्यामधे जाधव परत जखमी झाले. गाडी पंक्चर असल्यामुळे अतिरेक्यांनी थोड्या अंतरावर गाडी सोडली आणि समोरून येणारी स्कोडा गाडी थांबवली आणि निघून गेले आपल्या बाजूला काही क्षणापूर्वी बरोबर असलेले साथीदार रक्ताच्या थारोळ्यात शेवटचे श्वास घेताना त्यांनी पाहिले होते आपण पण जिवंत आहोत यावर त्यांचा विश्वास बसत न्हवता. त्या परिस्थिती मध्ये देखील स्वताला सावरत त्यांनी कंट्रोल रूम ला अतिरेकी स्कोडा गाडीतून कोणत्या दिशेने पळून गेलेत याची इत्यंभूत माहिती दिली. आणि नंतर आपल्या सहकाऱ्यांच्या मृत्यूची बातमी देखील दिली. त्यांच्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी कसाब आणि त्याच्या साथीदाराची वाट अडवली आणि तिकडे आपल्या सातारच्या एका वाघाने स्वतःचा जीव गमावून कसाब ला जिवंत पकडुन दिले ते म्हणजे तुकाराम ओंबळे साहेब. अरुण जाधव यांनी जखमी अवस्थेत दिलेली माहिती पोलिसांना खूप उपयुक्त ठरली आणि कसाब जिवंत सापडला … काही दिवस हॉस्पिटल ला उपचार घेऊन जाधव साहेब आजही आपले कर्तव्य बजावत आहेत मुंबई पोलिस दलात ते एन्काऊंटर टीम मध्ये काम करतात. खटाव तालुक्यातील वडुज हे त्यांचे मूळ गाव. त्यांच्या या अतुलनीय शौर्या ला सलाम करण्याचा आजचा दिवस …

🙏सर्व शहिदांना नमन🙏 जय हिंद जय महाराष्ट्र🚩🇮🇳🇮🇳

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट