माता व बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाने प्रभावी उपाययोजना कराव्या- जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांचे निर्देश

पालघर
उप संपादक – मंगेश उईके

दि. 20 : जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील माता आणि बालमृत्यु टाळण्यासाठी आरोग्य विभागाने प्रभावी उपाययोजना कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी आरोग्य विभागाला दिले.
आदिवासी भागातील माता आणि बालमृत्यु टाळण्यासाठी राज्याच्या धर्तीवर जिल्हयात स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गाभा समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, डहाणू आणि जव्हार येथील प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, अपूर्वा बसूर (दूरदृश्य प्रणाली द्वारे), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंखे, जिल्हा प्रजनन व बालसंगोपन अधिकारी डॉ. सागर पाटील, तसेच सर्व तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी, महिला व बाल विकास कार्यक्रम अधिकारी, ग्रामिण फ़स्ट फ़ाऊंडेशन या अशासकिय संस्थेचे प्रतिनीधी, पोलीस प्रतिनीधी उपस्थित होते,
माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रभावी कार्यवाही करून स्थलांतर, विटभट्टी मान्यता, कुपोषण, कमी वयातील प्रसुती, शाळाबाह्य मुली, कुटुंब नियोजन या जिल्ह्याला सतत भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाययोजना कराव्यात असे निर्देश हि जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी दिले
जिल्ह्यातील माता व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी मुंबईच्या जे .जे रुग्णालयातील जेष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी, स्री व बालरोग तज्ञ तसेच हिंदुजा फ़ाऊंडेशन यांच्या सहकार्याने विशेष कार्यक्रम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिले. तसेच पावसाळ्यामध्ये सर्व विभागांनी कार्यक्षेत्रामध्ये कर्तव्यदक्ष राहुन निरंतर कार्यरत राहण्याच्या सुचना दिल्या.
जिल्ह्यातील पावसाळ्यातील संपर्क तुटणारी गावे, पाडे, दुर्गम भागातील रस्ते, रुग्णांची ने – आण करतांना रुग्णवाहिका व प्रशासकिय व्यवस्थेत निर्माण होणारा ताण या सर्व विषयांवर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विशेषकरुन गरोदर माता व बालके यांना संदर्भसेवा त्वरीत उपलब्ध करुन देण्यासाठी उपलब्ध रुग्ण्वाहिका सुस्थितीत ठेवण्याच्या तसेच याबाबत भविष्यात कोणतीही दिरंगाई होणार नाही यासाठी दक्ष राहण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड यांनी दिले.